मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण

 आपल्या मुलांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता तेव्हा त्यांच्याशी तुमचा एक विशेष बंध तयार होतो. शिवाय, यामुळे मुले आपले विचार व भावना चांगल्याप्रकारे व्यक्‍त करण्यास शिकतात. मुलांसोबत अशी जवळीक—घरातच नव्हे तर बाहेरही आणि कोणत्याही उचित वेळी असणे महत्त्वाचे आहे असे शास्त्रवचनांतही सांगण्यात आले आहे.—  महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणापेक्षा आईवडील आपल्या मुलांसोबत जो वेळ घालवतात तो जास्त महत्त्वाचा असतो, या गोष्टीला बाल विकास तज्ज्ञ देखील दुजोरा देतात. ज्यांकरता वेगळा खर्च करावा लागणार नाही अशी दररोजची कामे करतानाही तुम्ही मुलांसोबत संवाद साधण्याच्या संधी निर्माण करू शकता. उदाहरणार्थ, मुलांना बागेत फिरायला नेऊन निसर्गातल्या विविध गोष्टींचे त्यांच्यासोबत तुम्ही निरीक्षण करू शकता. असे करताना त्यांना अर्थपूर्ण प्रश्‍न विचारून त्यांना आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला देता येईल. शास्त्रवचनांत म्हटले आहे, की “नृत्य करण्याचा,” अर्थात आनंदाने बागडण्याचाही एक समय असतो. मोकळेपणाने खेळणे हे मुलांच्या बौद्धिक, भावनात्मक आणि सामाजिक विकासाकरता आवश्‍यक आ...

मानवी वर्तनाचा ठाव घेणारे मानसशास्त्र !! भगवंत चव्हाण

 


आयुष्यात तुम्ही अमूकच वागता याला स्वभाव हेच कारण आहे की, आजुबाजूच्या वातावरणाचा कितपत प्रभाव आहे. काय टाळता येतील किंवा नेमकी अडचण काय आहे हे उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करतो. अर्थात यात मानसशास्रीय पद्धतींचाही वापर केला जातो. -क्षुल्लक कारणांवरून होणारी भांडण, खून,बलात्कार सारख्या घटनांवर अंकुश आणण्याची गरज आहे. सातत्याने समोर येणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर नुसते विचारमंथनच करण्यापेक्षा सखोल अभ्यास केल्यास पर्याय निघू शकतो. खरे तर या घटनांमुळे मानवी संबंधावरच प्रश्नचिन्ह उभे राहले आहे. शिवाय यातून कोणताच वयोगट सुटलेले नाही. खाजगी आयुष्य व समाजातील वावर यांतील अंतर फारसे उरले नाही. या अनुषंगाने मानसशास्राला खुप महत्त्व आलं आहे, असं डॉ. वैशाली अष्टपुत्रे यांनी सांगितलं.

मानसशास्र कशाचा अभ्यास करते?

मानवी वतर्नाचा अभ्यास करणारे शास्रशुद्ध शास्र म्हणजे मानसशास्र होय, असे थोडक्यात म्हणता येईल. सोप्या भाषेत सांगायचे असेल तर जिथे माणसांचा वावर असतो तिथे मानसशास्र असायलाच हवे.

> प्र.नेमकी रूपरेषा कशी असते?


आयुष्यात तुम्ही अमूकच वागता याला स्वभाव हेच कारण आहे की, आजुबाजूच्या वातावरणाचा कितपत प्रभाव आहे. काय टाळता येतील किंवा नेमकी अडचण काय आहे हे उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करतो. अर्थात यात मानसशास्रीय पद्धतींचाही वापर केला जातो.

> प्र.विशेष प्राविण्य मिळवता येणारी क्षेत्र कोणती?

क्षेत्र कुठलेही असले तरी मानवी वर्तन थे
ट परिणाम करते. प्रत्येक परिणामांची सुरूवातच मुळात इथून होते. तेव्हा क्षेत्र आपण निवडायचे व प्राविण्यही त्यानुसारच. इंडस्ट्रिअल सायकोलॉजी,क्लिनीकल सायकोलॉजी, चाईल्ड सायकोलॉजी,स्कुल सायकोलॉजी ही त्यातल्या त्यात काही निवडक उदाहरणे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट यशाची

💁‍♂ _*पालकांनो, काळ बदललाय, तुम्हीही बदला!*_

मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण