मानवी वर्तनाचा ठाव घेणारे मानसशास्त्र !! भगवंत चव्हाण
आयुष्यात तुम्ही अमूकच वागता याला स्वभाव हेच कारण आहे की, आजुबाजूच्या वातावरणाचा कितपत प्रभाव आहे. काय टाळता येतील किंवा नेमकी अडचण काय आहे हे उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करतो. अर्थात यात मानसशास्रीय पद्धतींचाही वापर केला जातो. -क्षुल्लक कारणांवरून होणारी भांडण, खून,बलात्कार सारख्या घटनांवर अंकुश आणण्याची गरज आहे. सातत्याने समोर येणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर नुसते विचारमंथनच करण्यापेक्षा सखोल अभ्यास केल्यास पर्याय निघू शकतो. खरे तर या घटनांमुळे मानवी संबंधावरच प्रश्नचिन्ह उभे राहले आहे. शिवाय यातून कोणताच वयोगट सुटलेले नाही. खाजगी आयुष्य व समाजातील वावर यांतील अंतर फारसे उरले नाही. या अनुषंगाने मानसशास्राला खुप महत्त्व आलं आहे, असं डॉ. वैशाली अष्टपुत्रे यांनी सांगितलं.
> मानसशास्र कशाचा अभ्यास करते?
मानवी वतर्नाचा अभ्यास करणारे शास्रशुद्ध शास्र म्हणजे मानसशास्र होय, असे थोडक्यात म्हणता येईल. सोप्या भाषेत सांगायचे असेल तर जिथे माणसांचा वावर असतो तिथे मानसशास्र असायलाच हवे.
> प्र.नेमकी रूपरेषा कशी असते?
> प्र.विशेष प्राविण्य मिळवता येणारी क्षेत्र कोणती?
क्षेत्र कुठलेही असले तरी मानवी वर्तन थे
ट परिणाम करते. प्रत्येक परिणामांची सुरूवातच मुळात इथून होते. तेव्हा क्षेत्र आपण निवडायचे व प्राविण्यही त्यानुसारच. इंडस्ट्रिअल सायकोलॉजी,क्लिनीकल सायकोलॉजी, चाईल्ड सायकोलॉजी,स्कुल सायकोलॉजी ही त्यातल्या त्यात काही निवडक उदाहरणे आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा