पालकांनो, मुलांना थोडा वेळ द्या, त्यांना समजून घ्या!
हल्ली मुलांचे संगोपन करणे म्हणजे कौशल्याचे काम आहे. कारण स्पर्धात्मक युगात माझी मुलगी किंवा माझा मुलगा मागे पडू नये यासाठी पालकांना सतत चिंता सतावत असते. पण लक्षात घ्या मुलं हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात त्याला जसं घडवू तसं ते घडतं. मुलांना आपण जे सांगू किवा आपण जसं बोलतो त्याचा परिणाम मुलांवर होतो. त्यामुळे पाल्याची बौद्धिक, मानसिक, शारीरिक, वाढ होत असताना वस्तुरूपी प्रेम नाही तर तुम्ही दिलेला वेळ बहुमूल्य असतो. त्यामुळे पालकांनी TV, Laptop, Computer, Tab, Mobile बाजूला ठेवून काही मुलांसोबत गप्पा मारायला हव्यात. हा उपक्रम खूप सकारात्मक बदल घडवून आणतो, आपल्यात आणि आपल्या पाल्यातही. आजची पिढी Gadget प्रिय. ती काळाची गरज सुद्धा आहे पण आपला पाल्य Gadget वर किती वेळ असतो. नेमक इंटरनेटवर काय Surfing करतोय? यावर लक्ष ठेवायला काहीच हरकत नाही. मात्र ते ही त्याला नकळत. सध्या स्वतःला त्रास देणं (self harm), चिडचिड करणं, सतत रागावणं, ह्या गोष्टी सध्या मुलांमध्ये जास्त दिसून येतात. अशात मुलांशी बोलण्यात काहीच उपयोग नसतो. यावेळी आपलाही पारा चढण्याची शक्यता असते. अशा वेळी पाल्याचे म्हण